खाजगी रुग्णालयांनी फिरवली पाठ, पण ‘सरकारी’ देवदूत धावून आले अन् माता-बाळाचे प्राण वाचले! जालन्यातील हृदयस्पर्शी घटना

Jalna Government Hospital Doctors Saved Mother Baby Life

Jalna Government Hospital: “देव तारी त्याला कोण मारी” या म्हणीचा प्रत्यय जालन्यात आला आहे. अत्यंत गुंतागुंतीची केस, दुर्मिळ रक्तगट आणि बाळाची उलटी स्थिती (पायाळू बाळ) असतानाही जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांनी दाखवलेल्या धाडसामुळे एका गरीब कुटुंबाचा आधार वाचला आहे. समोर आलेल्या या बातमीने सरकारी डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नेमकी घटना काय? Jalna Government Hospital Doctors Saved Mother Baby Life

घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी परिसरातील येवला येथील २५ वर्षीय पूजा बद्रीनाथ तांगडे या गरोदर महिलेला रविवारी प्रसूती कळा सुरू झाल्या. नातेवाईकांनी त्यांना तातडीने तीर्थपुरी येथील खाजगी रुग्णालयात नेले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांच्या पायाखालची जमीनच सरकली.

या महिलेचा रक्तगट ‘ओ निगेटिव्ह’ (O Negative) होता, जो अत्यंत दुर्मिळ मानला जातो. त्यातच बाळ गर्भात उलटे (पायाळू) असल्याने प्रसूती अत्यंत जोखमीची होती. रक्ताची अनुपलब्धता आणि संभाव्य धोका पाहून ५ खाजगी रुग्णालयांनी या महिलेला दाखल करून घेण्यास नकार दिला आणि छत्रपती संभाजीनगरला नेण्याचा सल्ला दिला.

जिल्हा स्त्री रुग्णालय ठरले ‘देवदूत’

महिलेची खालावलेली स्थिती पाहून नातेवाईकांनी त्यांना जालना येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात (Jalna Government Hospital) आणले. तेथेही रक्ताची उपलब्धता नव्हती, मात्र वेळ कमी असल्याने वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुदाम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अमोल लोंढे आणि त्यांच्या टीमने मोठी जोखीम पत्करण्याचा निर्णय घेतला.

वेळेत प्रसूती न झाल्यास माता आणि बाळ दोघांच्या जिवाला धोका होता. मात्र, डॉक्टरांनी आपल्या कौशल्याने या महिलेची यशस्वी नॉर्मल डिलिव्हरी पार पाडली. सध्या माता आणि बाळ दोन्ही सुरक्षित असून, एका गरीब कुटुंबाचा मोठा आर्थिक भुर्दंड वाचला आहे.

‘आम्ही केवळ कर्तव्य बजावले’

Jalna Government Hospital या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर डॉ. अमोल लोंढे यांनी भावना व्यक्त केल्या की, “परिस्थिती कठीण होती, पण योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे एका मातेचा जीव वाचला याचे मोठे समाधान आहे.” या मोहिमेत डॉ. अमोल लोंढे, सुधीर टापरे, मणेश मोरे आणि दीपाला खरात या टीमचा मोलाचा वाटा होता.

जालना न्यूज अपडेट (Jalna News Today)

खाजगी रुग्णालये अनेकदा जोखमीच्या केसेस नाकारतात, अशा वेळी जालन्यातील जिल्हा स्त्री रुग्णालय सामान्यांसाठी मोठा आधारवड ठरत आहे. या घटनेमुळे सरकारी आरोग्य यंत्रणेवरचा नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

माणुसकीचे दर्शन

एकीकडे वैद्यकीय क्षेत्राचे व्यापारीकरण होत असताना, जालन्यातील सरकारी डॉक्टरांनी ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ हे पुन्हा एकदा सिद्ध करून दिले आहे. एका गरिबाच्या घरचा दिवा सुरक्षित राहिल्याने संपूर्ण जिल्ह्यात या डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

View Comments (3) View Comments (3)

Comments are closed.