---Advertisement---
News

RBI Cancels License |आरबीआयने आणखी दोन सहकारी बँकांचे परवाने केले रद्द

---Advertisement---
HIGHLIGHTS
  1. Quick summary of the latest News update.
  2. RBI Cancels License: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बोटाड पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना तात्काळ रद्द करून बँकेला बिगर बँकिंग संस्था म्हणून...
  3. Local impact and reader takeaways are grouped for fast scanning.
  4. Follow Jalna News for verified updates as this story develops.

RBI Cancels License: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बोटाड पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना तात्काळ रद्द करून बँकेला बिगर बँकिंग संस्था म्हणून अधिसूचित केले आहे. यामुळे बोटाड पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेने बिगर सभासदांकडून ठेवी स्वीकारण्यासह ‘बँकिंग’चा व्यवसाय बंद करणे बंधनकारक आहे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे

RBI Cancels License of 2 co-operative banks

‘बोटाड पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, बोटाड’ बिगर बँकिंग संस्था म्हणून अधिसूचित झाल्यानंतरही त्यांच्याकडे असलेल्या बिगर सभासदांच्या थकीत आणि दावा न केलेल्या ठेवीची परतफेड करण्याची खात्री करेल, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

रिझर्व्ह बँकेने आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादितचा परवाना ही रद्द केला असून २९ डिसेंबरपासून बँक बँकिंग व्यवसाय बंद करणार आहे. रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील सहकारी संस्था आयुक्त आणि निबंधकांना बँक बंद करून लिक्विडेटर नेमण्याचे आदेश जारी करण्यास सांगितले आहे.

रिझर्व्ह बँकेने आदर्श महिला नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला कारण: बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नाही, बँकिंग नियमन कायद्याच्या अनेक कलमांचे पालन करण्यात अपयशी ठरले आहे आणि “बँक चालू ठेवणे ठेवीदारांच्या हितासाठी हानिकारक आहे”.

रिझर्व्ह बँकेने असेही म्हटले आहे की, सध्याची आर्थिक स्थिती पाहता बँक आपल्या सध्याच्या ठेवीदारांना पूर्ण पैसे देण्यास असमर्थ असेल आणि जर बँकेला यापुढे बँकिंग व्यवसाय करण्यास परवानगी दिली गेली तर सार्वजनिक हितावर विपरीत परिणाम होईल.

प्रत्येक ठेवीदाराला डीआयसीजीसी अधिनियम, १९६१ मधील तरतुदींच्या अधीन राहून ठेव विमा व पत हमी महामंडळाकडून (डीआयसीजीसी) ५,००,०००/- रुपये (केवळ पाच लाख रुपये) या आर्थिक मर्यादेपर्यंत च्या ठेवी विमा दाव्याची रक्कम मिळण्याचा हक्क असेल. बँकेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, ९९.७७ टक्के ठेवीदारांना डीआयसीजीसीकडून त्यांच्या ठेवींची पूर्ण रक्कम मिळण्याचा हक्क आहे, असे आरबीआयने म्हटले आहे.

बँकेच्या ठेवीदारांकडून मिळालेल्या इच्छेनुसार ३१ ऑक्टोबरपर्यंत डीआयसीजीसीने एकूण विमा ठेवींपैकी १८५.३८ कोटी रुपये भरले आहेत.

Share this articleFacebookWhatsAppXTelegram
Jalna News Desk

Jalna News Desk

The Jalna News desk covers verified local updates, civic developments, public interest stories, and district-wide news for readers in Jalna and Marathwada.

Read More

Next story will load as you read
Loading next story...
Scroll to Top